Saturday 12 April 2014

"तनी माझ्या झिंगु लागे ..."



काल, बऱ्याच दिवसांनी ती भेटली .... पहिलाच प्रश्न .... "अरे आहेस कुठे तू? किती दिवस झाले.... तुझी कविता वाचायला मिळाली नाही. काय लिहिलयस नवीन?"

"काय ग .. या कविता तुम्ही वाचून विसरून जाता. फार तर कधी तरी FB वर एखादा लाईक मारता. कशाला लिहायचं मी? आणि लिहिलं तरी कशाला पब्लिश करायचं?"

"अरे तुला माहिती नसेल .. पण तुझ्या कविता नं ... खरच छान असतात. मला आवडतात. आयुष्य एकदम छान आहे रे .. पण तरीही कधी कधी आयुष्यात एकदम पोकळी झाल्यासारखी वाटते. सारे काही छान असूनही काही तरी कमी आहे अस वाटत. तुझी कविता वाचली की खूप छान वाटत. मन एकदम हलक होऊन जात. मनावरच मळभ एकदम हटून जात. सांग नं .. काय लिहिलयस नवीन?" 

काय सांगणार? डोंबल माझं .. काहीच सुचतं नाहीय गेले काही दिवस .. असं का होतंय? काही कळत नाहीय.

"नाही ग ... काही नवीन सुचलं नाहीय.... मनाला भिडणारा असा काही विषय नाही."

"काय फ़ेकतोयस .... अरे केव्हढे विषय आहेत. जरा आजूबाजूला बघ."  

खरच! असं काय झालाय मला .... काही सुचतंच नाहीय. किती दिवस झाले. मन कशात गुंतलंय? 

काम? ... ते तर नेहमीचाच आहे. पूर्वीही होत.
मोकळा वेळ? .... मिळतोय की. 
आजूबाजूला लक्ष? .... आहे की. 
मग? ... काय करतोय मी हल्ली? 

अरे हो! गेले काही दिवस ते "तनी माझ्या झिंगु लागे ..." मनात पिंगा घालतंय. पहिले  कविता  सुचली. नंतर गाण्याची चाल सुचली आणि ती पिच्छाच सोडत नाहीय. गेले काही महिने मी हेच गाणे सतत गातोय. त्याच्या संगीताचे सूर मनात फेर धरून नाचतायत. एखादी चांगली गायिका .. तिच्याकडून हे गाणे करून घ्यायचे ... सतत हाच विचार .... मग दुसरे काही सुचणार कसे?  मी या माझ्याच कवितेच्या की गाण्याच्या प्रेमात पडलोय. कोणताही कलाकार जेंव्हा त्यानेच निर्माण केलेल्या कलाकृतीच्या प्रेमात पडतो तेंव्हा नवनिर्मिती थांबते. ऐकलं होत .... आता पटतंय.

आता हे गाणे कधी पिच्छा सोडेल तेंव्हाच काही तरी नवीन सुचेल.  





No comments: